ती पांढरीशुभ्र दाढी, तो धिप्पाड देह, तो पहाडी आवाज आता कायमचा निघून गेलेला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक प्रबोधनकार आपण गमावून बसलो नाही तर संतांच्या विचारांचा मॅनेजमेंट गुरु आपण हरवून बसलो आहोत. रामदास महाराज कैकाडी यांच्यावर संत नामदेव, संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम, संत चोखोबा, संत गाडगेबाबा , कैकाडी बाबा यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. ते कैकाडी बाबांचे पुतणे म्हणून संपूर्ण राज्याला परिचित होते. गाडगे महाराजांचे वैचारिक वारसदार यवतमाळ येथील चिंधे महाराज आणि रामदास महाराज कैकाडी यांनी संत गाडगे महाराजांचा विचार अत्यंत ताकदीने समाजामध्ये पेरण्याचे काम केले . चिंधे महाराजानंतर आता रामदास महाराज यांच्या जाण्याने हा विचार कोण पुढे नेईल, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
मी वर्षभर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. त्यांच्याच विश्वपुण्यधाममध्ये मुक्कामी होतो. त्यांचं जाणं फारच धक्कादायक आहे.
संतोष भाऊ,महाराजांचं व्यक्तिमत्व अत्यंत ताकदीने शब्दबद्ध केलं.तुमच्यामुळे 2003मध्ये महाराजांचे आशीर्वाद प्राप्त झाले होते.तो प्रसंग आज ह्यानिमित्याने आठवला. आदरणीय शिवदास महाराजांना विनम्र शिवांजली🌹🙏🌹