चित्रपट काही सांगू पाहतो का, या भानगडीत हा दिगदर्शक कधी पडतच नाही. तो आपली गोष्ट सांगून मोकळा होतो.. या पिक्चरमध्ये भन्नाट असे डायलॉग्ज आहेत. चित्रपटातली खास उर्दू मिश्रित भाषा ही सुद्धा अत्यंत लाघवी. एकदा मिर्झा आयुष्मानचं पांघरूण घेऊन आला असतो. तो चिडून जेव्हा तो घेऊन जातो, तेव्हा मिर्झा त्याला म्हणतो,की, ‘ले जाओ.. वैसे दिन भर पादे हे हम आज…’ जाम खदखदून हसू येतं. या अशा खऱ्या ह्यूमनाइज्ड इमोशन्स पाहायला मिळणं रेअरिटी आहे आणि अशा कित्येक जागा या चित्रपटात आहेत. एका सिनमध्ये स्वतः अप्पलपोटा असणारा आयुष्मान मिर्झाला म्हणतो, ‘मिर्झा, लालच जहर की तरह होता है, आदमी को अंदर से मार देता है’ यावर मिर्झा म्हणतो, ‘आजतक मैंने कभी सुना नहीं है के लालच से कोई मर गया हो… यह हवेली हमारी लालच नहीं.. उल्फत है , मोहोब्बत है हमारी… ‘ उफ्फ्फ हे असे डार्क डायलॉग्ज आहेत. आपण आपल्या लोभाला प्रेमाचं नाव देऊन स्वतःची सुटका करू पाहतोय का? असा विचार करायला लावणारे बरेच प्रसंग या चित्रपटात येतात.