दहा वर्षांत मोदी हे एकदातरी पत्रकार परिषदेला सामोरे गेले का? राहुल गांधी हे सतत पत्रकार परिषदा घेतात व पत्रकारांच्या तिरसट प्रश्नांना देखील शांतपणे उत्तरे देतात. मोदी फक्त ‘मन की बात’ रेडियोवर करतात, जनतेपासून सुरक्षित अंतरावर राहून राणा भीमदेवी थाटात भाषणे करतात आणि केवळ मर्जीतल्या पत्रकारांनाच गोड-गोड मुलाखती देतात. ज्या राहुल गांधींना मोदी हे सतत ‘शहजादे’ म्हणून हिणवत असतात, त्या राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर पायी चालत आणि विशेष सुरक्षेशिवाय सामान्य जनतेमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न हे शांतपणे समजून घेतले. राहुल यांनी आपल्या आजीची नि वडिलांची हत्या झालेली पाहिली होती. वडिलांच्या हत्येनंतर जर इच्छा असती, तर ते देश सोडून अन्यत्र सुखाने जगू शकले असते. कुठल्याही विशेष सुरक्षा कवचाशिवाय इतक्या सहजपणे गोरगरिबांमध्ये वावरताना मागील दहा वर्षांत मोदींना कोणी पाहिले काय?