हेच वास्तव ,त्याच्या सूक्ष्म छटांसह कवीने आपल्या ‘तळपाय’ कवितेत उतरवले आहे. हे वास्तव आपल्यापैकी कोणालाच नवे नाही .रोज ते आपण पाहतोच आहोत. मग कवीचे वेगळेपण काय ? कवीचे वेगळेपण हेच की ,रोज ,रोज पाहून परिचयाच्या झालेल्या या वास्तवाकडे कवी आपल्याला त्याच्या ‘खास’ दृष्टीतून आणि ‘विशिष्ट ‘भावजाणिवेतून पाहायला भाग पाडतो ;आणि त्या वास्तवाच्या अनेकविध सूक्ष्म परिमाणांचे प्रत्ययकारी दर्शन घडवतो !तेही विलक्षण कलात्मकतेने ! ! ‘रोज मरे त्याला कोण रडे ? ‘ असे म्हणतात खरे; पण कवी वाचणार्याला त्या रोजच्या मरणावरही पुन्हा नव्याने रडायला लावतो. त्यामुळे वाचकाचे डोळे अधिक स्वच्छ होतात , दृष्टी अधिक निर्मळ होते.त्याला सत्याचे उत्कट भावदर्शन घडते .
‘सामूहिक आत्महत्येची ख्रिस्तव्याकूळ भयभीषण मरणशैली’ ही या दीर्घ कवितेतील केंद्रीय प्रतिमा आहे .ख्रिस्ताला समूहासमोरच सूळावर चढविण्यात आले होते. त्याच्या हातापायात खिळे ठोकून त्याचे शरीर रक्तबंबाळ आणि हातपाय विदीर्ण केले गेले होते . ख्रिस्ताला सूळावर चढवण्यापूर्वी
कविता वास्तवदर्शी असून समाजाचे वेध घेणारी आहे. प्रतिकेच्या स्वरुपातले पसायदान खूप बोलके आहे. एकंदरीत सुंदर व विपन्नावस्थेत असणाऱ्या स्थलांतरित मजूरांची वेदना जाहीर कळणारी आहे.