ती झोपडी मुव्हेबल होती. ती झोपडी या गावावरून त्या गावाला कधी मुक्कामी जाईल याचा नेम नसायचा. ऋणमोचनवरून ही झोपडी बाजूच्याच आमला या गावी हलविण्यात आली. ‘काम करा अन् पोट भरा’ हे रोजगाराचे सूत्र या झोपडीच्या मनावर कायम कोरलेले. सासू, सुना शेतमजुरी करून प्रसंगी भीक मागून पोट भरू लागल्या अन् इकडे बाबा लोकांच्या मुखात मिष्टान्न भरविण्यात मग्न. मुलगी कलावतीचं लग्न ठरलं तर माय कुंताबाईने भीक मागावी आणि त्यातून लग्न पार पाडावे, असे फर्मान बाबांनी सोडले. लग्नाच्या अहेरात काही रोख रक्कम आली त्यातून बाबांनी बैलांच्या पोटापाण्याची सोय केली. काही दिवसांनी आमला येथून ही झोपडी बाजूच्या झिंगले-पिंगले या गावात हलविली. ओसाड जागेत ही झोपडी होती. अवतीभवती लांडगे व रानडुकरांचा वावर. सासू-सुना मजुरीला तर लहानगा गोविंदा झोपडीत. मायचं मन काय म्हणत असेल अशा वेळी. एवढ्यावरच ही परवड थांबली नाही. गोविंदास पुढे कळाशी या गावी मावशाकडे ठेवण्यात आले. सासू-सुना वेगवेगळ्या झोपडीत राहू लागल्या. काम करावे, भीक मागावी अन् पोट भरावे हे दैन्य त्यांच्या वाट्यास आले. गाडगेबाबांची पत्नी भीक मागून जगत आहे म्हणून अस्वस्थ होऊन मूर्तीजापूर येथील डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी कुंताबाईला स्वत:च्या घरी आश्रय दिला. त्यांना भीक मागू दिली नाही. बायकोला आश्रय मिळाला ही गोष्ट गाडगेबाबांच्या कानी गेली. बाबांनी लगेच डॉ. सहस्त्रबुध्दे यांना पाठविण्यासाठी पत्र लिहून घेतले. या पत्रातून त्यांची समाजसेवची कल्पना किती कठोर आणि पारदर्शक होती हे लक्षात येईल, ते पत्र असे होते-
बाबांनी ठरवलं, लग्न बम्बईत करायचं अन् तेही त्यांच्याच मताप्रमाणे होईल. सारी वऱ्हाडी मंडळी मुंबईत एकत्र आली. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश या परिसरातून बाबांचे अनुयायी पोहचले. बाबांनी पुन्हा एकदा धक्का दिला. ऐन लग्नाच्या दिवशीच गोविंदाला बाबांनी त्याचे लग्न असल्याचे सांगितले. अनुयायी थाटात लग्न करण्याच्या विचारात होते पण बाबांनी हा सारा डाव उधळून लावला. गोविंदास त्यांनी सांगितले की, “बाबू रे! आज तुह्य लगीन करायचं. उठा, भीक्षा मागून या.” लग्नाच्या दिवशी नवरदेव असलेला गोविंदा सातरस्त्यावर भीक मागत होता. बापाच्या कठोर नियमांचे चटके गोविंदाच्या मनास बसत होते. काय अवस्था झाली असेल बिचाऱ्या गोविंदाची? पण बाबा पुढं त्याचे काहीच चालत नव्हते. सारी मंडळी वरळीच्या डोंगरावर एका अनोख्या लग्नासाठी जाऊन पोहोचली. नवरदेव, नवरी, बाबांची आई, पत्नी, अनुयायी व स्वत: बाबा यांनी डोंगरावरील पटांगण झाडून स्वच्छ केले. अन् जुन्या कपड्यावर हळद लावून गोविंदा विवाहबध्द झाला. कॉन्ट्रक्टर असलेल्या अरूण पाटील यांनी त्यांच्या कामगारांच्या मदतीने डोंगरावर पाण्याची व्यवस्था केली. यावेळी बाबांनी कुणाचाही अहेर स्वीकारला नाही. एका श्रीमंत अनुयायाने आणलेले चांदीचे ताटही परत केले. गोविंदाची मिरवणूक चारचाकी वाहनातून काढावी म्हणून काही अनुयायांनी वाहने आणली होती पण बाबांनी मात्र वरात बैलगाडीतून काढली. दहा हजारांचा जनसमुदाय हे अनोखे लग्न डोळ्यात साठवून घेत होता. बापाच्या कठोरते पुढे गोविंदा मात्र स्तब्ध होता. असा हा मुलूखा वेगळा कुटुंब कठोर बाप.
Khup mahitipurn lekh
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला.. जगी थोर झाले. गाडगे बाबा…