या गावातील मुख्य समस्या पाणीटंचाई आहे. देश स्वतंत्र्य झाल्या पासून या गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. दिवाळी नंतर म्हणजेच साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून तिथे पाणीटंचाई निर्माण होत असते. तर फेब्रुवारी महिन्यापासून, येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गावात चार विहिरी दोन गावात तर दोन शेतारानात, मात्र या चारही विहिरीला पाणी नाही. सोबतच गावात येते वेळेस लागत असलेल्या विहिरी जवळ एक कूपनलिका (हापसी/हँडपम्प) आहे. ती सुद्धा कित्येक वर्षांपासून बंद असल्याचे दिसून येते. तिला दांडा नसून समोरील चेन सुद्धा नाही. व जंग चढलेली कोरडी पडून आहे. त्याचसमोर असलेली विहीर व गावच्या पुढील भागात असलेली विहिरी साधारणतः ३० ते ३५ फूट खोल परंतु दोन्ही विहिरीना पाणी नाही.
डोक्यावर दोन तीन गुंड शरीराचे बेहाल..
पाण्याअभावी उघड्यावर संडास, जनावरे दुबळी