हो,हो..त्यांची चिरफाड नंतर करू. गेल्या काही वर्षांत, महिन्यांत काय काय घडलं… हा सगळा कोळसा आज आपल्याला उगळायचा नाही. मात्र ज्यांनी उगळला त्यांचा समाचार नक्की घ्यायचा आहे! (घोषणा : ५० खोके.. गद्दार ओके!… हाताने घोषणा थांबवत-) ते आहेच; पण ह्या सटरफटर गोष्टींचा उल्लेख केलाच पाहिजे, असे काही नाही. आजच्या या प्रचंड प्रचंड उपस्थितीला, माझ्या भाषणाला कारणंही तशीच आहेत. देशाच्या अवनतीला कारण बनलेली, महाराष्ट्रहिताचा गळा दाबणारी प्रवृत्ती आज मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या कंठाला नख लावत आहे. त्याचा समाचार घ्यायचा तर आजच्याशिवाय दुसरा दिवस योग्य असणार नाही! (टाळ्या… घोषणा : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो! आव्वाज कुणाचा…. शिवसेनेचा!)