भाजपच्या नेत्यांना ट्रोल करण्याच्या नादात महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाकडे, अनागोंदीकडे मात्र सगळ्यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्र सरकारने सुरुवातीच्या टप्प्यात चांगले काम केले. परंतु नंतर ढिसाळपणा अनेक पातळ्यांवर दिसला. राज्यपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत अधिका-यांची, उच्चपदस्थांची नावे घेऊन उदाहरणासह काही गोष्टी सांगता येऊ शकतील, परंतु तो या लेखाचा विषय नाही. आता
माणसांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आहे. चाळीस दिवस वाट पाहून लोकांनी पुन्हा रणरणत्या उन्हात तान्ह्या बाळांना खांद्यावर घेऊन बायको-मुलांसह पायीच गावाची वाट धरली आहे. सिमेंट मिक्सरमधून लखनौला निघालेल्या अठरा कामगारांचे काळीज पिळवटून टाकणारे दृश्य दिसले. माणसं मरणाची जोखीम घेऊन रस्ता कापायला लागली आहेत. कोल्हापूरकडच्या अनेक लोकांनी दुधाच्या टँकरमधून गाव जवळ केले. हे सगळे पाहूनही काळजाला पाझर फुटत नसेल तर सरकारने डोळ्यावर कातडे ओढले आहे असेच म्हणावे लागेल. टीव्हीवरून संवाद साधून होणारी प्रतिमानिर्मिती तात्पुरत्या स्वरूपाची असते. घरात बसून नवनवे पदार्थ बनवून खाणा-या मध्यमवर्गीयांना तुम्ही थोर वाटू शकता. त्या थोरपणाला काडीची किंमत नाही. या अत्यंत वाईट काळात कुठलाही आधार नसलेल्या, उपाशी तापाशी माणसांसाठी काय केले, त्यांचे दुःख हलके करण्यासाठी कोणती पावले टाकली, स्वतः किती तोशीस लावून घेतली, यावरून तुमचे मूल्यमापन होणार आहे. केंद्राने पैसे दिले नाहीत, सूरतमध्ये मोठा उद्रेक झाला याकडे बोट दाखवून महाराष्ट्राचे अपयश लपवता येणार नाही.
सर्वाधिक टेस्ट महाराष्ट्राने केल्यात व सर्वाधिक मजूर (परराज्यातील ) तेही महाराष्ट्रात….
लपवीतोच म्हटलं तर टेस्ट ण करण्याची
” भिंत ” घालता आली असती.