अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.
अधिक कदम सरांचे प्रयत्न अभिनंदनीय आहे खरे तर राजकीय लोकांनी, मीडिया ने काश्मीर विषयी नकारात्मक वातावरण निर्माण करून पर्यटकांच्या मनात भीतीचे सावट उभे केले. काश्मीर आपला आहे तेथील नागरिक आपले आहे, आपण त्यांना प्रेमाची वागणूक दिली, तर दुरावा दूर होण्यास मदतच होईल. पण सरसकट काश्मिरी लोकांच्या विषयी नकारात्मक भूमिका घेतली, त्यांना भारत विरोधी लेबल लावले तर दुरावा आणखी वाढेल. सकारात्मक बातम्या, राजकीय स्थैर्य याची आवश्यकता आहे.
लेखिकेला काश्मीर, तेथील अधिक कदम सरांचे कार्य विषयी आलेला अनुभव निश्चितच विशद करण्यासारखे आहे असेच सकारात्मक लिखाण काश्मीर विषयी आवश्यक आहे,जेणे करून लोकांच्या मनातील काश्मीर आणि तेथील नागरिक यांच्या विषयीं भीती दूर होण्यास मदत होईल.
अधिक कदम सरांच्या कार्यास ईश्वर अधिक यश देवो हीच या प्रसंगी प्रार्थना….