साभार: साप्ताहिक साधना
– डॉ. आनंद नाडकर्णी
…………………………………………………..
…………………………………………………..
विनोबा लिहितात : ‘सत्याग्रही तोच असेल, जो सत्याचा दावा तर सोडणार नाही; परंतु समोरच्या जवळ सत्य नाहीच, असेही मानणार नाही. सत्याचा एक अंश माझ्यापाशी आहे, जो मी सोडणार नाही; परंतु दुसरा अंश त्याच्यापाशी असू शकतो आणि तो अंश कमी-अधिक असू शकतो. तटस्थ बुद्धीने त्याची चर्चा होऊ शकते… म्हणून सत्याग्रही बनण्यासाठी प्रथम सत्यग्राही बनायला हवं.’