मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुठली मागणी केली की तोंड वाकडे करणारा एक मोठा मध्यमवर्ग आहे. विशेषत: कर्जमाफी वगैरे. पण सरकारचं एक एक धोरण, किंवा कायद्यानं शेतीचं कसं वाटोळं होतंय हे लेखकानं उदाहरणासह ठिकठिकाणी मांडलंय. त्यातलं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे गावोगावचे ओस पडलेले जनावरांचे बाजार.