वाजपेयींच्या उदारमतवादी स्वभावाबद्दल/ व्यक्तिमत्वाबद्दल विरोधकांच्याही मनात शंका नव्हती; किंबहुना वाजपेयी हे भारतीय राजकारणातील ‘एकमेव अजातशत्रू’ व्यक्तिमत्व होतं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कोणाच्याही व्यंगावर वा आजारावर अशी उपहासात्मक टीका ही चुकीचीच आहे. त्याचं कोणत्याही आधारावर समर्थन होऊ शकत नाही. राहत साहेबांनी इथे पातळी सोडली, राहत साहेब अशोभनीय, दर्जाहीन वागले हे मान्य करावेच लागेल.