सोशल मीडियाचा ‘स्टट्रेजी’ म्हणून वापर करणारे उच्चशिक्षित तज्ज्ञ असोत, धार्मिक/जातीय तेढ वाढवून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ‘पोस्ट’चं तेल ओतणारे ‘कार्यकर्ते’ असोत की तात्कालिक खळबळ माजवून आपण नामानिराळे होण्याची चश्की असलेले समाजकंटक, यातल्या प्रत्येकालाच हे ठाऊक असतं की ‘माध्यम-अशिक्षित’ लोक किंचितही विचार न करता, कसलीही शहानिशा न करता, खरे खोटेपणा न तपासता मेसेजेस फॉरवर्ड करतात. या माध्यम असाक्षरतेमुळे एरवीची शिकलेली, सुसंस्कृत माणसंही ‘माध्यम-गुलाम’ म्हणून वापरली जातात.