तेव्हा माघार घ्यावी….

जेव्हा आपलंच माणूस
अनोळखी होतं …
तेव्हा…
शांतपणे माघार घ्यावी…….

जेव्हा संपतात सारी नाती
काही सकारण… अन
काही विनाकारण….
तेव्हा पुरावे मागू नयेत
नाती संपण्याचे..
तेव्हा….
शांतपणे माघार घ्यावी…

कधी काळी असतो आपण
कुणाचे तरी …हक्काचे
कधीतरी असते जागा
कुणाच्यातरी डोळ्यात…
पण कधीतरी नजरच होते
अनोळखी आणि परकी..
तेव्हा…
शांतपणे माघार घ्यावी…

कधीतरी आपण उगाचच
जपतो कुणालातरी…
मनात खोलवर…
जणू आपल्या अस्तित्वालाच
हवाली करतो कुणाच्यातरी
मर्जीवर आणि मनावर..
पण कधीतरी जाणवत…
कुणालाच नाही आपल्या
अस्तित्वाची दखल…
तुम्हीच बेदखल होता..
त्याच्या भावविश्वातून…
तेव्हा…
शांतपणे माघार घ्यावी…

उत्तराच्या अपेक्षेने…
का करून घ्यावेत स्वतःला
प्रश्नांचे डंख….
मिळणार नाहीत कधीच
प्रश्नांची उत्तरे….
तेव्हा…
शांतपणे माघार घ्यावी…

जेव्हा सगळंच संपते…
तेव्हाच नियती दान करते
एक अनमोल नजराणा…
त्याचं नाव …अनुभव
म्हणून सगळं संपत तेव्हा….
तेव्हा…
शांतपणे माघार घ्यावी…

Previous articleगांधी….पुन्हा पुन्हा!
Next articleअकेलेपन का अंदमान भोगते आडवाणी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here