(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)
-मिथिला सुभाष
+++++++
वहिदाच्या आग्रहामुळे गुरुदत्त कॅम्प सुटला तेव्हा ओपीमधे उमेद होती, ‘आशा’ होती. त्यावर तो तगला. पण जेव्हा शम्मीने त्याला नाकारला तेव्हा ओपीच्या अंताची सुरुवात झाली. त्याच सुमारास ‘चैन से हमको कभी आपने जिने ना दिया’ ही करुण विलापिका गाऊन आशा पण निघून गेली. ओपीचं म्युजिक असेल तर मी अर्ध्या मानधनात काम करेन, असं म्हणणारी मधुबाला दूर जात-जात आयुष्यातूनच गहाळ झाली. या सगळ्यांची जी गत तीच बीआर चोप्राची. ओपीला जे एकुलतं एक फिल्फेअर अवार्ड मिळालं ते चोप्रांच्या ‘नया दौर’मधे. त्या काळात फिल्मफेअर पुरस्कार विकत मिळत नव्हते. त्यामुळे त्यांना मान होता. पण फटकळ स्वभावामुळे चोप्रांनी ओपीला पुन्हा जवळ केलं नाही. सचिनदांकडे नवकेतनचा ग्रुप होता. शंकर-जयकिशन आरके घेरून बसले होते. रवीकडे चोप्रा, मदनमोहनकडे चेतन आनंद होते. एक ओपीच असा होता ज्याच्याकडे एखादी मातब्बर कंपनी नव्हती.
मिथिला सुभाष यांचं सध्या होणारं हे हिंदी चित्रपट विषयक लेखन वेधक आहे .
शैली विशेष आवडलेली .
– प्रब
अप्रतिम मॅडम
मला आवडतात अशी माणसं प्रस्थापितांना धक्का देणारी . लेखन तुमचं नेहमी छानच असतं.
बहोत बढिया