त्या रात्री मेजवानीच्यावेळी सोनिया गांधी बोलण्याऐवजी ऐकतच जास्त होत्या . जेव्हा जेव्हा धोरणांबद्दल उल्लेख होई त्यावेळी त्या मनमोहन सिंग यांच्याशी सहमती दाखवत होत्या . बऱ्याच वेळा त्या आमचं संभाषण त्यांच्या मुलावर केंद्रीत करण्याचा प्रयत्न करत होत्या . मला हे स्पष्ट जाणवलं की , त्या एक धूर्त आणि समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकण्याइतपत चाणाक्ष होत्या . राहुल मला हुशार आणि उत्सुक वाटला . तो त्याच्या आईसारखाच देखणा होता . त्यानं त्याच्या राजकारणासंबंधी पुरोगामी विचार आणि भविष्याबद्दल मत मांडले . अधूनमधून तो २००८ मधील माझ्या निवडणुकीच्या मोहिमेबद्दल थांबत थांबत भेदक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत होता पण , त्याच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आणि अपरिपक्वता जाणवली . जसं काही त्याने अभ्यासाची उत्तम तयारी केलेली होती आणि आपल्या शिक्षकावर प्रभाव टाकण्याची त्याची इच्छा होती . पण , कुठेतरी खोलवर त्याच्यामध्ये मला क्षमता किंवा योग्यतेचा आणि ध्यासाचा अभाव वाटला .
खरं तर , पक्षाविषयी एवढी कळकळ आणि अंगात धमक असेल तर सरळ सरळ आम्हाला राहुल गांधी यांचं नेतृत्व अमान्य असल्याचं जाहीर करुन या पोपटांनी पक्षाची सूत्रे हाती घ्यावीत पण , ते तसं करणार नाहीत कारण गांधी नावाचं नेतृत्व असल्याशिवाय यापैकी एकही पोपट नगर पालिकेच्या निवडणुकीतही निवडून येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे . प्रतिस्पर्धी असलेला भारतीय जनता पक्ष देशात पाळंमुळं कशी घट्ट करतो आहे याचा अभ्यास तरी या पोपट केला आहे का आणि तशी प्रदीर्घ काल सत्तेशिवाय राहून पक्षासाठी पूर्ण झोकून देण्याची तयारी या पोपटांनी आजवर कधी दाखवली आहे का , असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात . सरकार आलं की सत्तेची खूर्ची उबविण्या आणि स्वत:ची आलिशान निवासस्थाने उभारण्या पलीकडे यापैकी बहुसंख्य काँग्रेसी पोपटांनी कांहीही केलेलं नाही . असं असतांना या नेत्यांनी व्यक्त केलेल्या नाराजी म्हणा की असंतोष म्हणजे पिंजर्यातली फडफड आहे !