फडणवीसांचे ‘अधिक’ आणि ‘उणे’

प्रवीण बर्दापूरकर
तेव्हा मंत्री असलेल्या गणेश नाईक यांनी शिवसेना सोडतांना केलेल्या टीकेला उत्तर देतांना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी “जे कालपर्यंत प्रेम करत होते , पाया पडत होते , ते माझा आज एवढा तिरस्कार का करु लागले “, असा प्रश्न विचारला होता , याचं स्मरण सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी तुफान टीका आणि पक्षांतर्गत कथित उठाव पाहून आठवला . महिना-सव्वा महिनाभरापूर्वीपर्यंत ज्यांच्यावर , महाराष्ट्र भाजपचा आधारस्तंभ म्हणून स्तुतीसुमने उधळली जात होती , ज्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रभावी नेतृत्व म्हणून पहिलं जात होतं , ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आत्ताच्या घडीला जोरदार टीकेची राळ उठली आहे , समाज माध्यमांवर तर अत्यंत तिरस्करणीय भाष्य केली जात आहेत . महाराष्ट्राचा ‘अयशस्वी मुख्यमंत्री’ असा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे ; घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असं जे म्हटलं जातं ते हेच आहे .

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्ण अयशस्वी ठरले ही टीका वास्तवाला धरुन नाही असं माझं ठाम मत आहे , असं भाष्य मी गेल्या आठवड्याच्या मजकुरात सर्वात शेवटी केलेलं होतं त्याचं कारण कोणत्याही पदावर आलेला कुणीही माणूस शंभर टक्के यशस्वी नसतो आणि शंभर टक्के अयशस्वीही नसतोच . जसं , माणूस शंभर टक्के सदवर्तनी नसतो आणि शंभर टक्के दुर्वर्तनीही नसतो तसंच हे आहे . तस्सच मुख्यमंत्री आणि राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं काही ‘अधिक’ आणि कांही ‘उणे’ आहे . यातलं कोणतं पारडं जड आहे हे प्रत्येकजण त्याच्या आकलनाप्रमाणं ठरवू शकतो . अर्थात हे ठरवण्यासाठी कोणत्या तरी राजकीय विचाराचा गडद रंगाचा चष्मा न घालता , एकारलेपणा न करता , विवेक बुद्धीनं बघण्याची गरज आहे .

एक महत्वाचा भाग म्हणजे मी यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द पाहिलेली नाही . त्याच्या संदर्भात ऐकलं , वाचलं आहे . पत्रकार म्हणून मी जे पहिलं त्या पार्श्वभूमीवर सांगतो – अनेकांना पटणार नाही , काहींना तर मिरच्या झोंबतील तरी सांगतोच , महाराष्ट्राच्या सर्वोत्कृष्ट तीन मुख्यमंत्र्याचा माझा क्रम असा आहे ; एक- वसंतदादा पाटील , दोन-सुधाकरराव नाईक आणि तीन-देवेंद्र फडणवीस . मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बजावलेली कामगिरी निश्चितपणे उजवी आहे . विरोधी पक्षात प्रदीर्घ काळ गेल्यानं लोकांच्या प्रश्नाची फडणवीस यांची जाण आणि संवेदनशीलता किंचितही बोथट नव्हती . उच्चविद्याविभूषित असलेले देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या विकासाची तळमळ आहे आणि त्यासाठी ते पायाला चक्र लाऊन फिरले याबद्दल कोणतंही दुमत नाही . मात्र , पहिल्या दिवसापासून फडणवीस यांना विरोधाला तोड द्यावं लागलं . कोणी कितीही नाकारो आधी स्वपक्षातच त्यांची सर्वात जातीवरुन हेटाळणी झाली , हे अनेकांनी अनुभवलं आहे . मुख्यमंत्रीपदाच्या पक्षांतर्गत इच्छुकांनी सुरुवातीला तर भर मंत्रीमंडळाच्या बैठकीतही त्यांचा एकेरी उल्लेख केला गेलेला आहे ; त्याबद्दल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर हे उल्लेख थांबले . माझ्या चार दशकांच्या पत्रकारितेत मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीच्या जातीची एवढी चर्चा झाल्याचं आठवत नाही पण, फडणवीस यांनी कोणाच्याही जातीचा कधी उल्लेख केला नाही .

नंतर त्यांच्या देहयष्टीवरुन यथेच्छ टिंगलटवाळी सुरु झाली ती अजूनही थांबलेली नाही . खरं तर समाज माध्यम आणि लोडेड कार्यकर्त्यांनी हे लक्षातच घेतलं नाही की समाजात असंख्य लोक बेढब आहेत . देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्यावर ‘बच गया साला’ अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या , हे निरोगी समाजाचं लक्षण कसं समजता येईल ? ज्याची पत्नी प्रचंड कुरुपपणे ट्रोल झाली , असे देवेंद्र फडणवीस एकमेव मुख्यमंत्री आहेत . आपण बहुसंख्य अर्धवट किंवा चूक माहितीवर आधारित आणि जहाल व विवेकशून्य प्रतिक्रियावादी ( Mis or half informed rabid reactionary ) समाजात राहतो असा समज त्यामुळे कुणाचा झाला तर त्यात गैर कांहीच नाही . मात्र त्या टीकेकडे लक्ष न देता कार्यरत राहिलेल्या फडणवीस यांच्या ‘अधिक’मध्ये त्यांच्यातला हा समंजसपणा म्हणा की उमदेपणा म्हणा महत्वाचा आहे .

मराठा आरक्षण , शेतकऱ्यांना कर्जमाफी , मराठा तरुणाना रोजगारासाठी आर्थिक मदत , समृद्धी महामार्ग , सर्व लाभार्थीना पैसे थेट खात्यात , २४ तास वीज पुरवठा , जलयुक्त शिवार , नियुक्त्यांसाठी महापोर्टल , पत्रकार सन्मान योजना , एसटी महामंडळात महिलांना चालक म्हणून संधी , खाजगी शिक्षण संस्था चालकांच्या त्यांच्या सरकारने आवळलेल्या मुसक्या , दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोफत पास , मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड औद्योगिक विकासासाठी प्रयत्न , विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याला जास्त निधी , नागपूरवर तर मेहेरनजर अशी असंख्य चांगली कामं फडणवीस सरकारच्या नावावर आहेत . त्यात त्रुटी नक्कीच काढता येतील पण , अशी अनेक लोकहिताची कामं फडणवीस सरकारच्या नावे आहेत . कर्जमाफीसाठी लाभार्थी शेतकरी निवडतांना या सरकारने निश्चित केलेले निकष निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत , त्यामुळे धनदांडगे माफीपासून दूर राहिले . महापोर्टलमुळे निवड प्रक्रियेत होणारे घोटाळे बंद होणार आहेत . असो , सत्तेत पांच वर्ष पूर्ण राहिलेल्या कोणत्याही सरकारने केलेल्या कामाची यादी नेहेमीच लांब असते .

तरीही , या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावी झालेली नाही हेही तितकंच खरं पण , याची कारणंही समजून घेणं आवश्यक आहे . सरकारच्या आणि प्रशासनाच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट निर्णयाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते हे खरं असलं तरी लोक सरसकट सरकार आणि प्रशासन एकाच मापाने मोजतात म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की , सरकारनं निर्णय घ्यायचे आणि प्रशासनानं अंमलबजावणी करायचे असते . नेमका घोळ इथेच झाला , सुरुवातीला प्रशासनानं सहकार्य केलं नाही ; नंतर निर्माण झाला तो मुख्यमंत्री कार्यालयात उभारल्या गेलेली समांतर यंत्रणा ‘चहापेक्षा किटली गरम’ ठरली . ही गरम केटली आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा ( की परस्परांवर कुरघोडी करण्याचा ? ) होता . स्वत: देवेंद्र फडणवीस स्वच्छ राहिले पण या गरम किटल्यांतून उडालेले शिंतोडे आणि कांही सहकारी व अधिकाऱ्यांच्या संशयास्पद वर्तनाचे डाग फडणवीस यांच्या प्रतिमेवर पडलेच . त्यासाठी जणू ‘क्लीन चीट’ची टांकसाळच फडणवीस यांनी सुरु केलेली होती . देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकचालकानुवर्ती आहे असा समज त्यातून जो साधार पसरत गेला .

सरकारच्या अनेक चांगल्या योजना आल्या पण शेवटच्या स्तरावरील सामान्य लोकांपर्यंत लाभ पोहोचण्यास उशीर तरी झाला किंवा ते लाभ पोहोचलेच नाही . या संदर्भात देवेंद्र फडणवीस कायमच अंधारात राहिले . Too good is too bad also हे ते विसरले . योजनांच्या अंमलबजावणीचे जे कागदी घोडे प्रशासनाने नाचवले गेले त्यावर फडणवीस विसंबून राहिले . अनेक प्रामाणिक व कार्यक्षम अधिकाऱ्याची योग्य जागी नियुक्त करणंही फडणवीस यांना जमलं नाही . प्रवीण परदेशी , अजोय मेहेता , राधेश्याम मोपलवार , यशस्वी यादव , सतीश माथुर , संजीव जैस्वाल , ब्रजेश सिंग यांच्यासारख्या अनेक अधिकाऱ्यांना ‘अभय’ देण्यानंही प्रशासनात वाईट तर ज्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली त्यांना मोकळं सोडल्यानं जनतेत विपरीत संदेश गेला . सरकारच्या ‘स्टार्ट अप’ या योजनेची वाट लावण्यात असे कांही अधिकारीच जबाबदार आहेत . या योजनेत म्हणूनच १०० पैकी ८२ उद्यमी परराज्यातले समाविष्ट झाले . फडणवीस यांनी जाहीर करुन आणि त्याबाबत विधानपरिषदेत आश्वासन देऊनही नागपूरच्या महिला पत्रकार सुनीता झाडे यांना आर्थिक सहाय्य मिळालं नाही ; त्याला कारण ही बथ्थड नोकरशाही आणि या गरम किटल्याच आहेत . मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बसून कारभार चालवण्यावर भर न दिल्यानं प्रशासनात शिस्त आलीच नाही . सांगली , कोल्हापूरच्या भीषण पुराच्या काळात देवेंद्र फडणवीस निवडणूकपूर्व प्रचार यात्रेत रमले ही तर फार मोठी घोडचूक होती . या पुरापासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेला ओहोटी झपाट्यानं लागण्यास प्रारंभ झाला .

मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राजकीय पातळीवरही देवेंद्र फडणवीस राज्यातले यशस्वी नेते म्हणून पुढे आले . ( पक्षातल्या कांहीना फडणवीस यांनी डावललं यात आश्चर्य आणि गैरही कांहीच नाही ; फडणवीस यांच्याऐवजी पंकजा मुंडे , खडसे , तावडे मुख्यमंत्री असते तरी त्यांनीही कुणाला न कुणाला असंच डावललं असतं , त्यालाच राजकारण म्हणतात ! ) या काळात राज्यातल्या सर्व निवडणुकात पक्ष विस्तार करण्यात देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती यश मिळवलं ; उद्धव ठाकरे यांच्याशी मैत्री राखूनही शिवसेनेची कोंडी करण्याची कोणीही संधी त्यांनी सोडली नाही आणि महाराष्ट्र भाजपचा एकमेव चेहेरा म्हणून ते पुढे आले . पण, त्याच वेळी सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती नकारात्मक होत गेली ; ‘मी म्हणजे महाराष्ट्र’ आणि ‘ मी म्हणतो तीच पूर्व दिशा’ असा (अहं )भाव त्यांच्या वृत्ती व देहबोलीत हळूहळू आला . त्यातच अन्य पक्षातून आवक वाढली . देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तेजन दिलं आणि ‘केडर’ नाराज होतं गेलं . ( यातील दस्तुरखुद्द नागपुरातील अनेकांनी नंतर भाजपला मतदान करणं टाळलं ; त्यातील अनेकांची नावं मला माहिती आहेत . ) शरद पवार म्हणजे महाराष्ट्र हे रुढ झालेलं राजकीय समीकरणही देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढल्यासारखं चित्र निर्माण झालं आणि त्यांच्या भाषेत ‘आम्ही’ ऐवजी ‘मी’ असा दर्प आला . पण , त्यांना शरद पवार यांचा नेमका अंदाज आला नाही आणि अलीकडच्या दीड-दोन महिन्यातल्या शरद पवार यांच्या खेळीनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीतून विरोधी पक्ष नेत्याच्या जागेवर नेऊन बसवलं ! विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही शिवसेना आणि भाजपत ( उद्धव आणि अमित शहा यांच्यात ) बंद दाराआड ‘काय ठरलं’ होतं हे सांगण्याचं धारिष्ट्य फडणवीस यांनी का दाखवलं नाही हे एक कोडंच आहे .

मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस ‘नॉट रिचेबल’ झाले हाही एक आक्षेप अगदी नागपूर ते मुंबई असा केला जातो आणि त्यात तथ्यही असलं ( त्यात चहाच्या केटलींचा वाटा मोठा असला ) तरी सत्तेत गेलेल्या कुणाचीही ती अपरिहार्य मजबुरीही असते हे विसरता कामा नये . मुख्यमंत्रीच नव्हे तर राज्य मंत्रीपदाचीही व्यवधानं व्यापक असतात . मुख्यमंत्र्यांची वेळ मिळणं आणि सुरक्षा हे फार मोठे अडथळे असतात . कुणाला आणि त्यातही कोणत्याही राजकीय विचाराच्या ज्येष्ठांना टाळणं किंवा ताटकळवत ठेवणं हा देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव नाही , हे मी स्वानुभावानं सांगतो . ते आधी आमदार होते , त्याकाळात फोन केला तर आमची भिन्न राजकीय विचारसरणी आड न आणता आणि वडिलकीचा मान राखून ते कमी-अधिक उशीरा का असेना नागपूरच्या आमच्या कार्यालयात किंवा माझ्या घरी येत असत . प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांचे व्याप वाढले ; ते कसे वाढतात हे ठाऊक असल्यानं मी त्यांना एसएमएस टाकून ठेवत असे आणि वेळ मिळताच त्यांचा फोन येत असे . माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्या कन्येच्या विवाहाचा अपवाद वगळता मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीस यांच्याशी एकही निवांत भेट नाही ; झाली ती भेटही तशी ओझरतीच होती . त्यावेळीही मला पाहताच ते पट्कन माझ्याकडे चालत आले . मी आता पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात नाही किंवा वृत्त वाहिन्यांवरही जात नाही तरी , ‘मुख्यमंत्री’ देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माझा कोणताही एसएमएस अनुत्तरीत राहिला नाही किंवा प्रतिसाद म्हणून त्यांचा फोन आला नाही असं घडलं नाही . आज प्रथमच वाच्यता करतो , ( प्रशासनानं दीर्घ वेळ लावला तरी ) ‘ग्रंथाली’च्या मुंबईतील जागेचं आणि पत्रमहर्षी अनंतराव भालेराव स्मृती ग्रंथासाठी सरकारकडून अनुदान देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून केवळ एका एसएमएसवर केलेलं आहे . असं सांस्कृतिक भान जपणारे शरद पवार , विलासराव देशमुख आणि सुधाकरराव नाईक यांच्यानंतरचे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचा हा अनुभव आहे .

देवेंद्र फडणवीस जर पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर आज भाजपत दिसणारी कथित नाराजी म्हणा की बंडाळी झाली नसती उलट त्यांची स्तुती करण्याची अहमहमिका बघायला मिळाली असती . एका मोठ्या भूकंपानंतर अनेक लहान धक्के बसतात तसं हे काहींसं मुख्यमंत्रीपद हातून गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना अनुभवायला मिळत आहे . त्या धक्क्यांच्या गर्दीत सहभागी न होता मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून त्यांच्यावर पूर्ण अयशस्वी असा ठप्पा मारताच येणार नाही ; तो त्यांच्यावर अन्याय ठरेल . अन्य सर्व मुख्यमंत्र्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्यातही कांही ‘अधिक’ आणि कांही ‘उणे’ आहे . शिवाय राजकारणात कोणतीच परिस्थिती कायम नसते हे लक्षात घेता , उद्या कांहीही घडू शकतं . देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही घडी , झालेल्या चुकांबाबत आत्मपरीक्षण करण्याची आणि त्यातून धडा घेण्याची आहे !

( देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे विवेक रानडे , नागपूर यांच्या सौजन्याने )

-प्रवीण बर्दापूरकर

Show quoted text
ही सुधारित कॉपी घ्यावी

फडणवीसांचे ‘अधिक’ आणि ‘उणे’

तेव्हा मंत्री असलेल्या गणेश नाईक यांनी शिवसेना सोडतांना केलेल्या टीकेला उत्तर देतांना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी “जे कालपर्यंत प्रेम करत होते , पाया पडत होते , ते माझा आज एवढा तिरस्कार का करु लागले “, असा प्रश्न विचारला होता , याचं स्मरण सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी तुफान टीका आणि पक्षांतर्गत कथित उठाव पाहून आठवला . महिना-सव्वा महिनाभरापूर्वीपर्यंत ज्यांच्यावर , महाराष्ट्र भाजपचा आधारस्तंभ म्हणून स्तुतीसुमने उधळली जात होती , ज्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रभावी नेतृत्व म्हणून पहिलं जात होतं , ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आत्ताच्या घडीला जोरदार टीकेची राळ उठली आहे , समाज माध्यमांवर तर अत्यंत तिरस्करणीय भाष्य केली जात आहेत . महाराष्ट्राचा ‘अयशस्वी मुख्यमंत्री’ असा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे ; घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असं जे म्हटलं जातं ते हेच आहे .

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्ण अयशस्वी ठरले ही टीका वास्तवाला धरुन नाही असं माझं ठाम मत आहे , असं भाष्य मी गेल्या आठवड्याच्या मजकुरात सर्वात शेवटी केलेलं होतं त्याचं कारण कोणत्याही पदावर आलेला कुणीही माणूस शंभर टक्के यशस्वी नसतो आणि शंभर टक्के अयशस्वीही नसतोच . जसं , माणूस शंभर टक्के सदवर्तनी नसतो आणि शंभर टक्के दुर्वर्तनीही नसतो तसंच हे आहे . तस्सच मुख्यमंत्री आणि राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं काही ‘अधिक’ आणि कांही ‘उणे’ आहे . यातलं कोणतं पारडं जड आहे हे प्रत्येकजण त्याच्या आकलनाप्रमाणं ठरवू शकतो . अर्थात हे ठरवण्यासाठी कोणत्या तरी राजकीय विचाराचा गडद रंगाचा चष्मा न घालता , एकारलेपणा न करता , विवेक बुद्धीनं बघण्याची गरज आहे .

एक महत्वाचा भाग म्हणजे मी यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द पाहिलेली नाही . त्याच्या संदर्भात ऐकलं , वाचलं आहे . पत्रकार म्हणून मी जे पहिलं त्या पार्श्वभूमीवर सांगतो – अनेकांना पटणार नाही , काहींना तर मिरच्या झोंबतील तरी सांगतोच , महाराष्ट्राच्या सर्वोत्कृष्ट तीन मुख्यमंत्र्याचा माझा क्रम असा आहे ; एक- वसंतदादा पाटील , दोन-सुधाकरराव नाईक आणि तीन-देवेंद्र फडणवीस . मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बजावलेली कामगिरी निश्चितपणे उजवी आहे . विरोधी पक्षात प्रदीर्घ काळ गेल्यानं लोकांच्या प्रश्नाची फडणवीस यांची जाण आणि संवेदनशीलता किंचितही बोथट नव्हती . उच्चविद्याविभूषित असलेले देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या विकासाची तळमळ आहे आणि त्यासाठी ते पायाला चक्र लाऊन फिरले याबद्दल कोणतंही दुमत नाही . मात्र , पहिल्या दिवसापासून फडणवीस यांना विरोधाला तोड द्यावं लागलं . कोणी कितीही नाकारो आधी स्वपक्षातच त्यांची सर्वात जातीवरुन हेटाळणी झाली , हे अनेकांनी अनुभवलं आहे . मुख्यमंत्रीपदाच्या पक्षांतर्गत इच्छुकांनी सुरुवातीला तर भर मंत्रीमंडळाच्या बैठकीतही त्यांचा एकेरी उल्लेख केला गेलेला आहे ; त्याबद्दल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर हे उल्लेख थांबले . माझ्या चार दशकांच्या पत्रकारितेत मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीच्या जातीची एवढी चर्चा झाल्याचं आठवत नाही पण, फडणवीस यांनी कोणाच्याही जातीचा कधी उल्लेख केला नाही .

नंतर त्यांच्या देहयष्टीवरुन यथेच्छ टिंगलटवाळी सुरु झाली ती अजूनही थांबलेली नाही . खरं तर समाज माध्यम आणि लोडेड कार्यकर्त्यांनी हे लक्षातच घेतलं नाही की समाजात असंख्य लोक बेढब आहेत . देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्यावर ‘बच गया साला’ अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या , हे निरोगी समाजाचं लक्षण कसं समजता येईल ? ज्याची पत्नी प्रचंड कुरुपपणे ट्रोल झाली , असे देवेंद्र फडणवीस एकमेव मुख्यमंत्री आहेत . आपण बहुसंख्य अर्धवट किंवा चूक माहितीवर आधारित आणि जहाल व विवेकशून्य प्रतिक्रियावादी ( Mis or half informed rabid reactionary ) समाजात राहतो असा समज त्यामुळे कुणाचा झाला तर त्यात गैर कांहीच नाही . मात्र त्या टीकेकडे लक्ष न देता कार्यरत राहिलेल्या फडणवीस यांच्या ‘अधिक’मध्ये त्यांच्यातला हा समंजसपणा म्हणा की उमदेपणा म्हणा महत्वाचा आहे .

मराठा आरक्षण , शेतकऱ्यांना कर्जमाफी , मराठा तरुणाना रोजगारासाठी आर्थिक मदत , समृद्धी महामार्ग , सर्व लाभार्थीना पैसे थेट खात्यात , २४ तास वीज पुरवठा , जलयुक्त शिवार , नियुक्त्यांसाठी महापोर्टल , पत्रकार सन्मान योजना , एसटी महामंडळात महिलांना चालक म्हणून संधी , खाजगी शिक्षण संस्था चालकांच्या त्यांच्या सरकारने आवळलेल्या मुसक्या , दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोफत पास , मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड औद्योगिक विकासासाठी प्रयत्न , विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याला जास्त निधी , नागपूरवर तर मेहेरनजर अशी असंख्य चांगली कामं फडणवीस सरकारच्या नावावर आहेत . त्यात त्रुटी नक्कीच काढता येतील पण , अशी अनेक लोकहिताची कामं फडणवीस सरकारच्या नावे आहेत . कर्जमाफीसाठी लाभार्थी शेतकरी निवडतांना या सरकारने निश्चित केलेले निकष निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत , त्यामुळे धनदांडगे माफीपासून दूर राहिले . महापोर्टलमुळे निवड प्रक्रियेत होणारे घोटाळे बंद होणार आहेत . असो , सत्तेत पांच वर्ष पूर्ण राहिलेल्या कोणत्याही सरकारने केलेल्या कामाची यादी नेहेमीच लांब असते .

तरीही , या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावी झालेली नाही हेही तितकंच खरं पण , याची कारणंही समजून घेणं आवश्यक आहे . सरकारच्या आणि प्रशासनाच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट निर्णयाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते हे खरं असलं तरी लोक सरसकट सरकार आणि प्रशासन एकाच मापाने मोजतात म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की , सरकारनं निर्णय घ्यायचे आणि प्रशासनानं अंमलबजावणी करायचे असते . नेमका घोळ इथेच झाला , सुरुवातीला प्रशासनानं सहकार्य केलं नाही ; नंतर निर्माण झाला तो मुख्यमंत्री कार्यालयात उभारल्या गेलेली समांतर यंत्रणा ‘चहापेक्षा किटली गरम’ ठरली . ही गरम केटली आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा ( की परस्परांवर कुरघोडी करण्याचा ? ) होता . स्वत: देवेंद्र फडणवीस स्वच्छ राहिले पण या गरम किटल्यांतून उडालेले शिंतोडे आणि कांही सहकारी व अधिकाऱ्यांच्या संशयास्पद वर्तनाचे डाग फडणवीस यांच्या प्रतिमेवर पडलेच . त्यासाठी जणू ‘क्लीन चीट’ची टांकसाळच फडणवीस यांनी सुरु केलेली होती . देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकचालकानुवर्ती आहे असा समज त्यातून जो साधार पसरत गेला .

सरकारच्या अनेक चांगल्या योजना आल्या पण शेवटच्या स्तरावरील सामान्य लोकांपर्यंत लाभ पोहोचण्यास उशीर तरी झाला किंवा ते लाभ पोहोचलेच नाही . या संदर्भात देवेंद्र फडणवीस कायमच अंधारात राहिले . Too good is too bad also हे ते विसरले . योजनांच्या अंमलबजावणीचे जे कागदी घोडे प्रशासनाने नाचवले गेले त्यावर फडणवीस विसंबून राहिले . अनेक प्रामाणिक व कार्यक्षम अधिकाऱ्याची योग्य जागी नियुक्त करणंही फडणवीस यांना जमलं नाही . प्रवीण परदेशी , अजोय मेहेता , राधेश्याम मोपलवार , यशस्वी यादव , सतीश माथुर , संजीव जैस्वाल , ब्रजेश सिंग यांच्यासारख्या अनेक अधिकाऱ्यांना ‘अभय’ देण्यानंही प्रशासनात वाईट तर ज्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली त्यांना मोकळं सोडल्यानं जनतेत विपरीत संदेश गेला . सरकारच्या ‘स्टार्ट अप’ या योजनेची वाट लावण्यात असे कांही अधिकारीच जबाबदार आहेत . या योजनेत म्हणूनच १०० पैकी ८२ उद्यमी परराज्यातले समाविष्ट झाले . फडणवीस यांनी जाहीर करुन आणि त्याबाबत विधानपरिषदेत आश्वासन देऊनही नागपूरच्या महिला पत्रकार सुनीता झाडे यांना आर्थिक सहाय्य मिळालं नाही ; त्याला कारण ही बथ्थड नोकरशाही आणि या गरम किटल्याच आहेत . मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बसून कारभार चालवण्यावर भर न दिल्यानं प्रशासनात शिस्त आलीच नाही . सांगली , कोल्हापूरच्या भीषण पुराच्या काळात देवेंद्र फडणवीस निवडणूकपूर्व प्रचार यात्रेत रमले ही तर फार मोठी घोडचूक होती . या पुरापासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेला ओहोटी झपाट्यानं लागण्यास प्रारंभ झाला .

मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राजकीय पातळीवरही देवेंद्र फडणवीस राज्यातले यशस्वी नेते म्हणून पुढे आले . ( पक्षातल्या कांहीना फडणवीस यांनी डावललं यात आश्चर्य आणि गैरही कांहीच नाही ; फडणवीस यांच्याऐवजी पंकजा मुंडे , खडसे , तावडे मुख्यमंत्री असते तरी त्यांनीही कुणाला न कुणाला असंच डावललं असतं , त्यालाच राजकारण म्हणतात ! ) या काळात राज्यातल्या सर्व निवडणुकात पक्ष विस्तार करण्यात देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती यश मिळवलं ; उद्धव ठाकरे यांच्याशी मैत्री राखूनही शिवसेनेची कोंडी करण्याची कोणीही संधी त्यांनी सोडली नाही आणि महाराष्ट्र भाजपचा एकमेव चेहेरा म्हणून ते पुढे आले . पण, त्याच वेळी सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती नकारात्मक होत गेली ; ‘मी म्हणजे महाराष्ट्र’ आणि ‘ मी म्हणतो तीच पूर्व दिशा’ असा (अहं )भाव त्यांच्या वृत्ती व देहबोलीत हळूहळू आला . त्यातच अन्य पक्षातून आवक वाढली . देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तेजन दिलं आणि ‘केडर’ नाराज होतं गेलं . ( यातील दस्तुरखुद्द नागपुरातील अनेकांनी नंतर भाजपला मतदान करणं टाळलं ; त्यातील अनेकांची नावं मला माहिती आहेत . ) शरद पवार म्हणजे महाराष्ट्र हे रुढ झालेलं राजकीय समीकरणही देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढल्यासारखं चित्र निर्माण झालं आणि त्यांच्या भाषेत ‘आम्ही’ ऐवजी ‘मी’ असा दर्प आला . पण , त्यांना शरद पवार यांचा नेमका अंदाज आला नाही आणि अलीकडच्या दीड-दोन महिन्यातल्या शरद पवार यांच्या खेळीनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीतून विरोधी पक्ष नेत्याच्या जागेवर नेऊन बसवलं ! विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही शिवसेना आणि भाजपत ( उद्धव आणि अमित शहा यांच्यात ) बंद दाराआड ‘काय ठरलं’ होतं हे सांगण्याचं धारिष्ट्य फडणवीस यांनी का दाखवलं नाही हे एक कोडंच आहे .

मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस ‘नॉट रिचेबल’ झाले हाही एक आक्षेप अगदी नागपूर ते मुंबई असा केला जातो आणि त्यात तथ्यही असलं ( त्यात चहाच्या केटलींचा वाटा मोठा असला ) तरी सत्तेत गेलेल्या कुणाचीही ती अपरिहार्य मजबुरीही असते हे विसरता कामा नये . मुख्यमंत्रीच नव्हे तर राज्य मंत्रीपदाचीही व्यवधानं व्यापक असतात . मुख्यमंत्र्यांची वेळ मिळणं आणि सुरक्षा हे फार मोठे अडथळे असतात . कुणाला आणि त्यातही कोणत्याही राजकीय विचाराच्या ज्येष्ठांना टाळणं किंवा ताटकळवत ठेवणं हा देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव नाही , हे मी स्वानुभावानं सांगतो . ते आधी आमदार होते , त्याकाळात फोन केला तर आमची भिन्न राजकीय विचारसरणी आड न आणता आणि वडिलकीचा मान राखून ते कमी-अधिक उशीरा का असेना नागपूरच्या आमच्या कार्यालयात किंवा माझ्या घरी येत असत . प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांचे व्याप वाढले ; ते कसे वाढतात हे ठाऊक असल्यानं मी त्यांना एसएमएस टाकून ठेवत असे आणि वेळ मिळताच त्यांचा फोन येत असे . माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्या कन्येच्या विवाहाचा अपवाद वगळता मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीस यांच्याशी एकही निवांत भेट नाही ; झाली ती भेटही तशी ओझरतीच होती . त्यावेळीही मला पाहताच ते पट्कन माझ्याकडे चालत आले . मी आता पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात नाही किंवा वृत्त वाहिन्यांवरही जात नाही तरी , ‘मुख्यमंत्री’ देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माझा कोणताही एसएमएस अनुत्तरीत राहिला नाही किंवा प्रतिसाद म्हणून त्यांचा फोन आला नाही असं घडलं नाही . आज प्रथमच वाच्यता करतो , ( प्रशासनानं दीर्घ वेळ लावला तरी ) ‘ग्रंथाली’च्या मुंबईतील जागेचं आणि पत्रमहर्षी अनंतराव भालेराव स्मृती ग्रंथासाठी सरकारकडून अनुदान देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून केवळ एका एसएमएसवर केलेलं आहे . असं सांस्कृतिक भान जपणारे शरद पवार , विलासराव देशमुख आणि सुधाकरराव नाईक यांच्यानंतरचे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचा हा अनुभव आहे .

देवेंद्र फडणवीस जर पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर आज भाजपत दिसणारी कथित नाराजी म्हणा की बंडाळी झाली नसती उलट त्यांची स्तुती करण्याची अहमहमिका बघायला मिळाली असती . एका मोठ्या भूकंपानंतर अनेक लहान धक्के बसतात तसं हे काहींसं मुख्यमंत्रीपद हातून गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना अनुभवायला मिळत आहे . त्या धक्क्यांच्या गर्दीत सहभागी न होता मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून त्यांच्यावर पूर्ण अयशस्वी असा ठप्पा मारताच येणार नाही ; तो त्यांच्यावर अन्याय ठरेल . अन्य सर्व मुख्यमंत्र्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्यातही कांही ‘अधिक’ आणि कांही ‘उणे’ आहे . शिवाय राजकारणात कोणतीच परिस्थिती कायम नसते हे लक्षात घेता , उद्या कांहीही घडू शकतं . देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही घडी , झालेल्या चुकांबाबत आत्मपरीक्षण करण्याची आणि त्यातून धडा घेण्याची आहे !

( देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे विवेक रानडे , नागपूर यांच्या सौजन्याने )

-प्रवीण बर्दापूरकर

Show quoted text

Comments are closed.