लक्षमबाईच्या देवळाजवळ मोठ्ठी होळी पेटायची . देऊळ लक्ष्मीचं होतं पण सगळे लक्ष्ममबाईच म्हणायचे .होळीसाठी गोळा केलेल्या लाकडांच्या भोवती ह्या माळा अर्पण करून शुद्ध मनाने प्रार्थना करून , होळीच्या पवित्र अग्नीत दुःख निराशा वाईट शक्तीचे दहन होऊ दे …सुख शांती समृद्धी येऊ दे . खरं म्हणजे आपला होळीच्या सणात इतका मोठा सहभाग आहे यातच फार मोठेपणा वाटायचा .थोडीशी राख चिमटीत उचलून कपाळाला आणि उरलेली तोंडात टाकल्याने रोगराई जाते असं ऐकलं होतं.
त्यांच्याकडे जुने कपडे नसतील म्हणून खिदळत, विषय आटोक्यात घेत ,दार अर्ध लावून घ्यायचं… दाराच्या आडोशाला उभं राहून गल्लीतून मुलं जातांना दिसली की रंगाचं पाणी केलेली बादली अंगावर टाकायची .एकदा बाहेर निघालो की बारा वाजेपर्यंत घराचं तोंड बघायचं नाव नाही . खेळून परत आल्यावर आई अक्षरशः रिन साबण लावून वेळ पडली तर कौलाच्या खापरोंडीने घासून घासून धुवून काढायची . जेवण झालं की दुपारी गाढ झोप लागायची .