या अशा गुन्ह्यांना फक्त सामान्य लोक बळी पडतात असे नाही. कित्येक सेलेब्रिटीजसुद्धा त्यांचे शिकार ठरले आहेत. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या खात्यातून ५ लाख रुपये गायब झाले होते. पंजाबचे मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांच्या पत्नी खासदार परनीत कौर यांच्या खात्यातून सुद्धा २३ लाख वळविण्यात आले होते. एक केंद्रीय मंत्री आणि केरळमधील एका खासदाराला दोन आणि दीड लाख रुपयांचा चुना लावण्यात आला होता. अर्थात ही काही मोजकी नावे आहेत. अशा हजारो लोकांना रोजच्या रोज चुना लावण्याचे प्रकार याच जामताडामधून घडत असतात.
पण आलेला कॉल फ्रॉड आहे हे कसे ओळखायचे?