(साभार : साप्ताहिक साधना)
-रामचंद्र गुहा
आता आपण राहत असलेल्या भारताला एका अतिशय वेगळ्या प्रकारच्या राष्ट्रवादाची चौकट बसवण्यात आलेली आहे. त्याचं अधिक योग्य वर्णन बहुधा ‘फाजील देशाभिमान’ असं करता येईल. राष्ट्रीय आणि विशेषतः धार्मिक श्रेष्ठत्वाच्या कर्कश सुरांतील आणि पूर्णतः डळमळीत दाव्यांवर आधारलेला हा विचार आहे. आपल्या आर्थिक धोरणांमध्ये आणि शैक्षणिक धोरणांमध्येसुद्धा ही आत्ममग्न वृत्ती दिसून येते. एकीकडे, भारतीय उद्योजकतेचं भरणपोषण करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात अकार्यक्षमता आणि साटेलोटेपणाला चालना देणारी आर्थिक धोरणं सध्या राबवली जात आहेत. तर दुसरीकडे, आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाला बाजूला सारून हिंदू वर्चस्वाचे पक्षपाती सिद्धान्त पुढे रेटण्याचे हानिकारक प्रयत्न सुरू आहेत.
………………………………………………………

मानवतेसाठी भारतीय लोकांनी आशेचा, शांततेचा आणि सदिच्छेचा संदेश पाठवला आहे. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रामध्ये केलेला हिंसाचार आज आपण विसरून जाऊ. खरोखरच शांततापूर्ण व चांगलं जग निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रत्येक देशाचा दयाळूपणा, प्रत्येक राष्ट्राची व्यक्तिगत कृती गरजेची आहे, हे तेवढं लक्षात ठेवू या. आपल्याला जर्मनीचं तांत्रिक कौशल्य, तिथलं वैज्ञानिक ज्ञान, तिथलं संगीत गरजेचं आहे. आपल्याला इंग्लंडमधला उदारमतवाद, धैर्य आणि वाङ्मय गरजेचं आहे. आपल्याला इटलीचं सौष्ठव गरजेचं आहे. आपल्याला रशियाच्या जुन्या उपलब्धी आणि नवीन विजय गरजेचे आहेत. आपल्याला ऑस्ट्रियातील हास्याचं वरदान, तिथलं सुंदर हास्यप्रेम गरजेचं आहे. आपल्याला तिथली संस्कृती आणि तिथलं उदार जगण्याविषयीचं प्रेम हवं आहे. आणि चीन- चीनबद्दल काय बोलावं? आपल्याला चीनमधली शहाणीव, तिथलं धैर्य आणि तिथली नवीन आशा गरजेची आहे. आपल्याला तरुण अमेरिकेचं तेज आणि साहसाची प्रेरणा गरजेची आहे. आपल्याला आदिम लोकांचं ज्ञान आणि बालसुलभ साधेपणा गरजेचा आहे. शांततेच्या पुनरुत्थानासाठी, स्वप्रतिष्ठेच्या पुनरुत्थानासाठी आपल्याला सर्व मानवतेची गरज आहे.







उत्तम लेख, पण हे सामान्य माणसाच्या गळी उतरविण्यासाठी विचारवंत व इतर पक्षाच्या नेत्यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन ब्रेनवॉश करणे आवश्यक आहे.
अतिशय सुंदर आणि निर्भयपनेआपण आपले विचार व्यक्त केले आहेत सर… नाहीतर “संघ परीवार व त्यांचे शाखेतील विषमतावादी विखारी विचार”हे बहुजन समाजाला च नव्हे तर संपूर्ण मानवजातीला घातक आहेत. हे सांगनाऱ्या व्यक्ती सध्या कमी प्रमाणात आहेत…. कारण तुम्ही समतावादी विचार जर पेरण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही तुमचा” दाभोळकर “करू…. ही विचारसरणी कार्यरत असणाऱ्या च्या हातात सत्ता आहे…