(साभार : साप्ताहिक साधना)
-रामचंद्र गुहा
आता आपण राहत असलेल्या भारताला एका अतिशय वेगळ्या प्रकारच्या राष्ट्रवादाची चौकट बसवण्यात आलेली आहे. त्याचं अधिक योग्य वर्णन बहुधा ‘फाजील देशाभिमान’ असं करता येईल. राष्ट्रीय आणि विशेषतः धार्मिक श्रेष्ठत्वाच्या कर्कश सुरांतील आणि पूर्णतः डळमळीत दाव्यांवर आधारलेला हा विचार आहे. आपल्या आर्थिक धोरणांमध्ये आणि शैक्षणिक धोरणांमध्येसुद्धा ही आत्ममग्न वृत्ती दिसून येते. एकीकडे, भारतीय उद्योजकतेचं भरणपोषण करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात अकार्यक्षमता आणि साटेलोटेपणाला चालना देणारी आर्थिक धोरणं सध्या राबवली जात आहेत. तर दुसरीकडे, आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाला बाजूला सारून हिंदू वर्चस्वाचे पक्षपाती सिद्धान्त पुढे रेटण्याचे हानिकारक प्रयत्न सुरू आहेत.
………………………………………………………
Comments are closed.