जनमत

Gandhi-150

-उत्पल व्ही .बी.

मी : जरा बाजूला व्हाल का?

गांधीजी : का? अच्छा, टीव्ही अडतोय होय…

मी : हो

गांधीजी : जवळजवळ भांडतायत रे हे लोक

मी : त्याला चर्चा असं म्हणतात

गांधीजी : आणि यातून काय निष्पन्न होतं?

मी : जनमत तयार होतं अहो.

गांधीजी : म्हणजे टीव्हीजन इतर जनांचं मत तयार करतात

मी : हो

गांधीजी : आणि मग इतर जन काय करतात?

मी : जनमताचं रूपांतर निवडणुकीच्या मतात करतात.

गांधीजी : हं…आणि मग जे सरकार येईल त्याची प्रशंसा किंवा त्याच्यावर टीका करतात

मी : बरोबर.

गांधीजी : पण जनांनी स्वतः काहीतरी करायला हवं ना?

मी : मत देतातच की!

गांधीजी : पण ते पुरेसं होत नाहीये ना?

मी : पुरेसं कधीच काही होणार नाही.

गांधीजी : असं कसं? सत्तेचं विकेंद्रीकरण, स्वशासन, जमिनीची सामायिक मालकी अशा गोष्टींवर काम केलं पाहिजे. माणसाच्या वृत्तीवर काम केलं पाहिजे.

मी : ते बोअरिंग आहे हो.

गांधीजी : मग एक्सायटिंग काय आहे?

मी : तुम्ही पुन्हा ज्याच्या मधे येताय ते.

Previous articleमार्क्स, लेनीन समजून घेताना …
Next articleबहुजन समाज कृतघ्न आहे काय?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.