बुद्ध धर्माची स्थापना गौतमाने इ. स. पूर्व सहाव्या शतकात केली. त्याच काळात महावीरानेही त्याचा जैन धर्म स्थापन केला. ज्ञान, शिकवण व उपदेश त्यांनीही केला… पण त्याआधीही माणसे होती व त्यांच्याजवळ जीवनोपयोगी ज्ञान होते. पैगंबराचा जन्म इ.स. 570मधला. त्याच्यावर अल्लाची पहिली आयत (उपदेश) उतरली 612मध्ये. मग कुराणाची रचना व तोच इस्लामचा जन्मकाळ ठरला.
मार्क्सच्या या चिकित्सेचा खरा अर्थ वंचितांना वंचित ठेवणे व प्रस्थापितांचे वर्चस्व कायम ठेवणे हा यामागील या ग्रंथांचा हेतू आहे. दुर्दैवाने धर्माची ही खोटी शिकवणच साऱ्या जगाच्या मनाचा ताबा घेणारी व तिच्यातून माणसांची सुटका होऊ न देणारी आहे. ती पिढ्यान्पिढ्या व शतकानुतके केवळ बिनबुडाच्या श्रद्धेच्या बळावर टिकून आहे.
माधवाचार्यांची पातळी व यातली मजल टोकाची आहे.