
त्याची भाषा इतकी साधी आणि प्रवाही असते की, त्यातून सामान्य प्रेक्षकासोबत त्याची पटकन नाळ जुळते. ‘है ना’ हे खास बिहारी टोनमध्ये म्हणत तो सर्वांसोबत दिलखुलास हसतो. भाषेच्या एकूणच वापराविषयी तो कमालीचा सजग आहे. विविध भाषांविषयी त्याला आस्था आहे. भाषिक राजकारणाची जाण आहे. त्याच्या साध्या सोप्या हिंदीमुळे लोकांशी तो सहज जोडला जातो. ‘इश्क में शहर होना’ हे त्याचं लघुप्रेमकथांचं (लप्रेक) पुस्तक असो, किंवा ‘कस्बा’ हा त्याचा ब्लॉग असो, त्याच्यातलं कवीमन, लेखकाची शैली या गोष्टी लगेच लक्षात येतात.
अनेकवेळा रविषकुमार यांनी मोदी यांच्या विरोधात ते नाहीत, काँग्रेस ची सत्ता असतानाही त्याची पत्रकारिता आता सारखीच होती असे त्यांच्या प्राईम टाईम कार्यक्रमातून विषद केले, करतात. तथापि अंध भक्त हे मानावयास तयार नाहीत, हे दुर्दैवी आहे. सत्तेत कोणीही असो, काम करताना त्यांच्या कडून चुका होणारच, किंवा लोकविरोधी निर्णय घेतल्यास, त्यांना प्रश्न विचारणे, चुका आम लोकांच्या नजरेस आणून देणे हे प्रामुख्याने पत्रकारांची जबाबदारी असताना, सद्य स्थितीत पत्रकार सत्तेचे लांगूलचालन करणारे झाले हे दुर्दैवी आहे.
आज दिल्ली पासून गल्ली पर्यंत पत्रकारिता, (अपवाद वगळता) ज्या पद्धतीने सुरू आहे त्याचा उबग येतो.
सत्ताधीश यांच्या विरोधात गेल्यास विविध धाडी टाकून त्यांचे जिणे हराम केल्या जात आहे, एनडीटीव्ही च्या मालकावर आणि रविशकुमार यांच्या विरोधातील असले प्रकार घडले, मात्र ते बाधले नाही, ते अभिनंदनास पात्र आहेत.
मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यावर त्यांचे अभिनंदन न करण्याचा कोतेपणा, सर्वांनी अनुभवला आहे. त्याचे शल्य रविशकुमार यांना असेल. पण लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले, हे काही कमी नाही.
दोन दिवसा पूर्वी ज्येष्ठ पत्रकार विनोद दूवा यांचे निधन झाले त्यांच्या निधनाची आणि कार्याची माहिती हा एक स्वतंत्र विषय असताना प्राईम टीव्ही चॅनल आणि प्रिंट मीडिया ने सुद्धा पाहिजे तश्या बातम्या दिल्या नाहीत, एकूणच निधना नंतरही त्यांच्या विषयी मनाचा कोतेपना पहावयास मिळाला ते गोदी मीडिया वाले नव्हते म्हणून हा आकस! हे फारच झाले