औरंगजेबने आपल्या इच्छापत्रात ‘मृत्यूनंतर माझी कबर माझे गुरू सैय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारी असावी. ती मी स्वतः कमावलेल्या पैशातच बांधावी. त्यावर एक मोगऱ्याचं छोटं रोपटं लावावं,’ अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार खुलताबादला ‘गुरू’ सैय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीशेजारी औरंगजेबची कबर बांधण्यात आली. औरंगजेब फावल्या वेळात टोप्या विणायचा आणि ‘कुराण शरीफ’ नकलून काढायचा. त्यातून जी कमाई झाली, तेवढ्याच पैशात; म्हणजे १४ रुपये १२ आणे खर्चात त्यावेळी कबर बांधण्यात आलीय. ही कबर औरंगजेबचा मुलगा आझमशाह ह्याने बांधलीय. त्याने पुढे आपल्या आईच्या स्मरणार्थ औरंगाबादेत ‘ताजमहाल’सारखा दिसणारा ‘बीबी का मकबरा’ही बांधला. त्यात औरंगजेबच्या पत्नीची कबर आहे. १९०४-०५ च्या दरम्यान लॉर्ड कर्झनला ह्या कबरीची माहिती समजली. ‘१६५९ ते १७०७ इतका काळ दिल्लीचा बादशहा असलेल्याची कबर इतकी साधी कशी काय असू शकते?’ असं वाटल्याने त्याने कबरीभोवती मार्बल ग्रिल बसवून थोडी सजावट केली. (ही कबर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे.)
हिंदुत्वाच्या नावाने सनातनी – कर्मकांडी ब्राह्मण्याचा पाश आवळत लोकशाहीचा गळा घोट केला जातोय, हे देशाचं वर्तमान आहे. हे लक्षात घेऊनच सातारामधील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी *जवाहर राठोड* यांची ‘पाथरवट’ ही कविता वाचून दाखवली असावी. त्यात कवी म्हणतात-
कविता आणखी बरीच मोठी आहे. त्यात माणसाला जातीनिशी दारिद्र्यात लोटणाऱ्या अमानुषपणावर विचाराची नेमकी छिन्नी धरल्याने, वर्ण्यव्यवस्थेने माजवलेल्या जाती अहंकाराचे छिलके शब्दांच्या प्रत्येक घावाने निघतात. देव-धर्म-संस्कृतीच्या नावाने चाललेला खोटेपणा तुटून पडलेला उठून दिसतो. हा सुशिक्षितालाही गुलाम बनविणारा शतकानु शतकांचा खोटेपणा शरद पवार यांनी वाचून दाखवल्याने तो दाभिकांवर घणाघातासारखा कोसळला असावा. त्यामुळे ‘पवारांनी देवाचा बाप काढला,’ असे गळे काढण्यात आले. ते अज्ञानातून आणि अंधभक्तीने काढलेले गळे होते. कारण अशा कामासाठी ‘भूदेव’ स्वत: कधीच पुढे येत नाहीत. ते त्याकरिता स्वत:च्या शेंड्या सांभाळत बिनशेंडीचे नारळ वापरतात.
हत्यारांप्रमाणेच कुठल्याही माध्यमात दोष नसतो; तो वापर करणार्यांत असतो. सुरी डॉक्टरच्या हातीही असते. तिचा वापर तो शस्त्रक्रियेसाठी करतो. तीच सुरी चोराच्या हाती असेल, तर तो तिचा वापर धमकावण्यासाठी वा मारण्यासाठीही करील. ह्यातला दुसरा वापर ’सोशल मीडिया’तही होतोय. त्यातून शरद पवारांबाबत अत्यंत घृणास्पद मजकूर लिहिणाऱ्या केतकी चितळेचं प्रकरण पुढे आलंय.
वास्तववादी लिहिता