कबीर सिंग आणि गांधी

उत्पल व्ही. बी.

गांधीजी : कबीर सिंग पाहिलास काय ?
मी : नाही.
गांधीजी : बरं मग अर्जुन रेड्डी?
मी : पाहिलाय. पण मी काही बोलणार नाहीये त्याच्यावर.
गांधीजी : अरे! का बरं?
मी : कंटाळा आला आहे.
गांधीजी : तुला समीक्षेचा कंटाळा आलाय चक्क? मत द्यायचा कंटाळा? तेही सिनेमावर मत द्यायचा कंटाळा? तुला काहीच कसं वाटत नाही? ये मैं क्या सुन रहा हूँ? कुछ लेते क्यूँ नहीं? मुंग्यांनी मेरूपर्वत तर नाही ना…
मी : अहो…
गांधीजी : काय?
मी : थंड घ्या जरा…मी देतो मत. पण भंकस आवरा…
गांधीजी : जाऊ दे रे. तुला नाही द्यायचं ना मत, नको देऊस. मी उगाच गंमत करत होतो.
मी : हं…
गांधीजी : पण काय रे, अशी ब्रोकन कॅरॅक्टर्स बरीच असतात ना अलीकडे? मी तुला खरं सांगू का, मला कधीकधी झेपत नाहीत अशी कॅरॅक्टर्स.
मी : हं
गांधीजी : म्हणजे मला जरा गोंधळायला होतं.
मी : हं
गांधीजी : म्हणजे असं बघ…आणि चिडू-बिडू नकोस हां, मी आपलं मला काय वाटतं ते सांगतो. तुला त्यातलं जास्त कळतं हे मला माहीत आहे.
मी : अहो ठीक आहे. बोला की. एवढं काय…
गांधीजी : म्हणजे माझं काय म्हणणं आहे…की बाबा रे, तुझं कायतरी सॉलिड गंडलंय हे आपल्याला कबूलच आहे. आणि तुला ते खूप पेनफुल होतंय. पण आपण ज्याला संपूर्ण जीवन म्हणू ते फक्त तेवढंच आहे का? जीवनाला काही एक दिशा असावी की नाही? काहीतरी रचनात्मक दिशा? आणि असं रचनात्मक काही करत असताना तू तुझ्या इश्यूजशी, इनर डेमन्सशी झगडतो आहेस तर ते कौतुकास्पद आहे. पण असं पूर्णपणे ब्रोकन असणं….मला हा प्रश्न त्या देवदासबाबतही पडला होता बरं.
मी : या स्टोरीज आहेत. आणि ही त्यातली पात्रं आहेत. आता पात्र कसं उभं राहतं? तर प्रत्यक्षातली माणसं जशी असतात, असू शकतात त्या गुणधर्मांच्या आधारे. आणि मग त्यात कल्पनाविस्तार आहेच. पण जे प्रत्यक्षात आहे त्याचंही प्रतिबिंब त्या पात्रात आहे…
गांधीजी : म्हणजे मग अशा चित्रणांना इतकं महत्त्व द्यायचं कारण नाही असं तुझं म्हणणं…?
मी : महत्त्व द्यावं की नाही…चांगला प्रश्न आहे.
गांधीजी : त्याचा परिणाम होतो मला वाटतं लोकांवर. म्हणजे ते बघून लोक काहीतरी वेड्यासारखं वागतात, वागू शकतात. बरोबर?
मी : पण तो दोष कथा सांगणाऱ्याचा नाही. कथा हे एक स्वतंत्र विश्व आहे. मानवी जीवन कशी वळणं घेऊ शकतं याचं ते एक चित्रण आहे. आर्टिस्टिक इंप्रेशन आहे. आता त्या कथेतल्या पात्रांच्या गुणदोषांमुळे तुम्ही अतिप्रभावित होऊन गंडत असाल तर तो तुमचा दोष नाही का?
गांधीजी : असं म्हणतोस…पटतंय तसं मला.
मी : आणि हे गंडणं तसं जुनंच आहे. आज जय श्रीराम म्हणत काही लोक इतरांचा जीव घेतायत. कारण मुळात त्यांच्यावर एका कथेचा, एका नॅरेटिव्हचा अतिप्रभाव आहे. त्यांच्यातला हैवान बाहेर आला तो कुणामुळे? थेट रामामुळे नाही. तर रामाभोवती उभ्या केल्या गेलेल्या नॅरेटिव्हमुळे. आता प्रश्न हा की यासाठी रामाला दोष द्यायचा का?
गांधीजी : …..
मी : काय झालं?
गांधीजी : मला वाटतं, द टाइम यू आर लिव्हिंग इन इज काइंड ऑफ ब्रोकन. अँड दॅट्स व्हाय पीपल आर ब्रोकन.
मी : बरोबर आहे.
गांधीजी : बट हू ब्रोक द टाइम?
मी : काळ घडतो-बिघडतो तो आपल्यामुळेच. लोकांमुळेच.
गांधीजी : बरोबर.
मी : सो वी हॅव टू फिक्स व्हॉट वी हॅव ब्रोकन.
गांधीजी : राइट.
मी : फक्त ते कसं करावं हे कळत नाही.
गांधीजी : एक करता येईल.
मी : काय?
गांधीजी : तुला पटणार नाही.
मी : सांगा तर.
गांधीजी : रामाचंच नाव घेऊन सुरूवात करायची.

#मीआणिगांधीजी ३६

9850677875

Previous articleशंभर वर्ष पुढे पाहणारा लोकराजा
Next articleडॉ दाभोलकरांच्या डोक्यात गोळी मारायला सांगितले होते …
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.