बहिणीचा नवरा आंधळा आणि तिने डोळ्याला पट्टी बांधलेली. त्यामुळे शकुनी तिथेच राहिला. तुम्हीच सांगा, सोळा वर्षांची राजकन्या.. या घरात तिच्या ओळखीचं कुणी नाही.. माहेर शेकडो मैल दूर.. शिवाय माहेर या लोकांपेक्षा सर्वार्थाने थोडं कमी प्रतीचं.. सासरच्या मंडळींचा पूर्ण आर्यावर्तात दबदबा.. आणि ज्याच्या खांद्यावर डोकं टेकायचं तो आंधळा. धोक्याने लावलेले लग्न.. या सिच्युएशनमध्ये कुठल्या भावाचा पाय निघेल..?? त्यानंतर कौरव-पांडव मोठे झाल्यावर तर या कुटुंबावर आणखी एक अन्याय झाला.. धृतराष्ट्र आंधळा म्हणून पंडू राज्य करत होता. पंडूनंतर ते राज्य कुणाचं होतं? पांडवांचं..?? नाही..!! पंडू फक्त ‘केअरटेकर’ होता, न्यायाने विचार करा, ते राज्य पंडूच्या मुलांना का बरं मिळावं? राज्य दुर्योधनाचं होतं. मग दुर्योधनाचा मामा शकुनी चिडणार नाही..?? आधीच त्याच्या बहिणीवर अन्याय, नंतर भाचरांवर अन्याय..!! या लोकांमुळे स्वत:चा देश सुटलेला.. अशा परिस्थितीत काय अपेक्षा करायची शकुनीकडून..??