‘ जनता कर्फ्यू’च्या संध्याकाळी सुपरहिरोने लोकांना थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सांगितल्या. ‘कोरोना’च्या भीतीने, रोगप्रतिकारक शक्ती भक्कम असतानाही विवेकशक्ती गमावलेल्या समाजाने हातात काही मिळेल ते बडविले. त्यावेळीच ‘समाजअंतर’ राखण्याच्या मूळ अटीचा भंग झाला. गरज ‘कोरोना’विरुद्ध जागृती करताना आरोग्य सुविधा वाढवल्या का, सरकारी जबाबदारीत काय वाढ करण्यात आलीय, हे स्पष्ट करणे अपेक्षित असताना; टाळ्या-थाळ्या वाजविणे ; दिवे लावणे, असे उपक्रम लोकांनी राबवण्याचे आवाहन करण्यात आले. या पुढचा उपक्रम देशी गायीच्या शेणाने घर सारवण्याचा वा गोमुत्राची फवारणी करण्याचा असू शकतो.