
-सानिया भालेराव
क्वांटम लिव्हिंग या कॉन्सेप्टवर मागच्या वेळी सहज लिहिलं होतं आणि बऱ्याच जणांनी यावर अधिक वाचायला आवडेल असं कळवलं. खूपवेळा काय होतं की दोन अधिक दोन म्हणजे चार असा नियम लावून आपण जगत असलो आणि निर्मिकाच्या कृपेने आपल्यावर अशी वेळ आली नसेल जिथे आपल्याला दोन अधिक दोन काही वेळा शून्य तर काही वेळा सहा देखील होताना पाहावं लागतंय… तेव्हा आयुष्य हे चौकटीबध्द, रॅशनल असतं, असा ठाम विचार करायची आणि मांडायची अशा लोकांना लग्झरी असते. पण गणिताचे नियम आयुष्यात चुकतांना जे पाहतात त्यांना काहीही होऊ शकतं हे उमजतं आणि मोस्टली ते अधिक फ्लॅगझीबल होतात.
सो एखादी व्यक्ती पोसिबिलीटीजची, मल्टिपल रिएलीटीजची गोष्ट करत असेल, तर ती व्यक्ती, तिचे विचार कसे अवैज्ञानिक, अविवेकी आणि सो ऑन आहेत असं वाटणं वगैरे असं होऊच शकतं. पण भिडू आपल्याला कशाचाही अट्टाहास नाही. मला कोणालाही काहीही पटवून द्यायचं नाहीये बॉस. एनर्जी, व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी आणि आपल्या विचारांची ताकद यावर माझा विश्वास आहे. साधं बघा, एखाद्या बारक्या गोष्टीने आपण जर इरिटेट झालो, आणि आपण त्याच विचारांमध्ये दिवसभर राहिलो, तरं आपोआप त्याच घटना, तशीच माणसं =आपण अनुभवत राहतो . म्हणूनच एनर्जी शिफ्ट, पिव्हटिंग फार महत्वाचं आहे. आता नसेल पटत तर करत राहा विरोध. समोरचा कसा चुकीचा आणि मी म्हणतो ते कसं बरोबर राहा करत. मला मात्र इतकंच समजतं की मी लक्ष कुठे देते यावर माझा पुढचा येणार क्षण अवलंबून आहे आणि म्हणून फ्रिक्वेन्सी जिथे जुळते ते करत राहावं. याचा मोठा पुरावा माझ्या मागच्या लिखाणावरच्या तुमच्या सुंदर प्रतिक्रिया आणि म्हणून आपल्याकडे म्हणतात जे पेराल ते उगवेल.. इंटेन्शन, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी महत्वाची. आणि म्हणून ही सिरीज. लिहिता लिहिता मला देखील अजून शिकायला मिळेल आणि हाय व्हायब्रेशन्सचे लोक जवळपास राहतील.. हा माझा यामागचा स्वार्थ!
क्वांटम फिजिक्स सांगतं की आपले विचार आणि एनर्जी (ऊर्जा) आपल्या वास्तवावर प्रभाव टाकतात. आपल्या भोवतालचे जग हे अनंत शक्यतांचे जग (Multiverse) आहे आणि आपण ज्या शक्यतेवर लक्ष केंद्रित करतो, तीच आपली प्रत्यक्षात येणारी गोष्ट ठरते.अल्बर्ट आईनस्टाईनच्या E=mc² या संकल्पनेनुसार, ऊर्जा आणि वस्तुमान (Energy & Mass) परस्परांत रूपांतरित होऊ शकतात. म्हणजेच, आपल्या सर्व विचारांमध्ये आणि भावनांमध्ये देखील ऊर्जा असते. क्वांटम सिद्धांतानुसार, आपली वस्तुस्थिती ही नुसत्या निरीक्षणामुळे निश्चित होते. जर आपण विशिष्ट परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले, तर तीच परिस्थिती आपल्या आयुष्यात आकार घेते. आता हे एक विधान आहे.यावर असं वाटू शकतं की हि काय वेडगळ बडबड आहे. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का सानिया, की एखादी गोष्ट जर वाईट घडली तर मग पुढे ज्या एकामागून एक वाईट गोष्टी घडत जातात, ते मी स्वतः तसा विचार केल्यामुळे?? व्हॉट नॉन्सेन्स? यात काय डोंबलं विज्ञान आलं? हा मूर्खपणा आहे आणि अशा दोनशे पासष्ठ गोष्टी तुम्ही मला ऐकवाल.
तर यावर माझं उत्तर हे असेल, कि पहिली जी वाईट घटना घडली त्यानंतर तुम्ही जर निगेटिव्ह थॉट पॅटर्न्स बाबत अवेअर झाला आणि मग प्रयत्न करून पॉझिटिव्ह थॉट पॅटर्न्सकडे लक्ष दिलं आणि व्हायब्रेशनल शिफ्ट दिलीत तर कदाचित पुढे घडणाऱ्या वाईट घटना थांबतील. थोडक्यात वाईट घटनाचक्राला स्थगिती मिळेल. असं होत खूपदा की आपली घरी चिडचिड झाली की कामाच्या ठिकाणी सुद्धा अगदी सध्या गोष्टीत आपण चिडतो किंवा व्हाईस व्हर्सा… हे अत्यंत स्वाभाविक आहे. आपण जेव्हा स्वतःला शांत करतो तेव्हा तीच गोष्ट आपल्याला छोटी वाटते आणि आपण बेटर पद्धतीने सिच्युएशन हॅन्डल करतो. पटतंय का?
हेच कारण आहे की काही लोक सतत अडचणींचा सामना करतात, तर काही जण सकारात्मकतेने भरलेले आयुष्य जगतात. जर आपण नेहमी समस्यांबद्दलच विचार करत राहिलो, तर त्याच समस्या पुन्हा-पुन्हा आपल्या वाट्याला येतात. उलट, जर आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले, तर त्यादृष्टीने आपल्या आयुष्याची घडण सुरू होते. लक्ष केंद्रित करण्याच्या प्रक्रियेमुळेच विशिष्ट शक्यता वास्तवात बदलते.
जर आपण नकारात्मकतेवर भर दिला, तर ती आणखी वाढते. त्यामुळे ज्या गोष्टींना आपण महत्त्व देत नाही, त्या आपल्याला फारसा त्रास देत नाहीत. हे वाक्य पुन्हा वाचा. आपल्याला कोणी त्रास द्यायचा हे आपण ठरवू शकतो. आपल्या एखाद्या पोस्टवर लोक तुटून पडतात. त्यातलं एखादं वाक्य धरून चावत बसतात. उत्तर द्यायला गेलं तर अजून चिघळतं. ९९ टक्के वेळी आपण काहीही उत्तर दिलं तरी कमेंट करणारा त्यातही लूपहोल काढून पुन्हा अजून कमेंट करत बसतो. काहीवेळा होतो त्रास आपल्याला. त्यापेक्षा काढून घेतलं, मामला सॉल्व्ह. नो एक्सप्लेनेशन.. वाटलं तर घ्या नाहीतर जाऊ द्या.
आता ही संकल्पना आधुनिक वैज्ञानिकांपुरती मर्यादित नाही. नेविल गॉडर्ड या प्रसिद्ध तत्त्वज्ञाने देखील हेच सांगितले आहे की “तुमच्या कल्पनेत निर्माण झालेले चित्रच तुमच्या वास्तवात प्रकट होते.” ते म्हणतात की “फक्त विचार बदलून काही होत नाही, तर त्यासोबत भावनात्मक विश्वास असणे महत्त्वाचे आहे.” आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि कल्पनाशक्तीने जणू त्या आधीच घडल्या आहेत असे समजतो, त्या अधिक वेगाने साकार होतात. त्यामुळे, जर तुम्हाला तुमचे जीवन बदलायचे असेल, तर तुमच्या अंतरिक भावनांवर आणि विचारांवर अधिक सजग राहा.
ही प्रक्रिया ऐकायला गूढ वाटू शकते पण फार सहज आहे. परिस्थितीशी सामना करताना आपण विचार काय करतो यावर परिणाम अवलंबून असतात. कित्येक प्रसिद्ध स्पोर्ट्समनने सुद्धा फायनल गेमच्या आधी व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरल्याचं सांगितलं आहे. यावर पुढच्या वेळी सविस्तर लिहीन. सो आपल्या विचारांमध्ये शक्ती आहे, आणि आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, त्या गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग बनतात. म्हणूनच, आज तुम्ही कोणत्या वास्तवाची निवड करणार आहात? चॉईस इज युवर्स!
नक्की वाचा-क्वांटम फिजिक्स, मल्टिपल रिऍलीटीज आणि मॅनिफेस्टेशन आणि या मागचं सायन्स..https://mediawatch.info/quantum-physics-multiple-realities-and-manifestation-and-the-science-behind-it-by-saniya-bhalerao/
(लेखिका नाशिक येथे MET’s Institute of Pharmacy येथे कार्यरत आहेत)
सानिया भालेराव यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –सानिया भालेराव– type करा आणि Search वर क्लिक करा.