स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात सहकारी चळवळीत त्यांचे योगदान, त्यांच्या ताब्यातील कृष्णा सहकारी कारखाना आणि मुख्यमंत्री होण्याआधी त्यांचा महाराष्ट्र मंत्रिमंडळातील दीर्घ अनुभव याविषयी काय बोलावे?’’ सातवीपर्यंत शिकलेल्या वसंतदादा पाटलांनी मुख्यमंत्री बनल्यावर देशपातळीवर शिक्षणक्षेत्रात दूरगामी परिणाम होईल असा एक निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचे काही काळातच देशातील इतर राज्यांतही अनुकरण झाले. हो, तो निर्णय होता, व्यावसायिक शिक्षणाचे खासगीकरण करणे. वसंतदादांनी घेतलेल्या या (बऱ्या-वाईट) धोरणात्मक निर्णयामुळे डॉक्टर, इंजिनियर, वगैरे व्यावसायिक पदवी शिक्षण खासगी शिक्षणसंस्थांत मिळू लागले, नवे शिक्षणसम्राट उदयास येऊन मग बड्या रकमेच्या बदल्यात या कॉलेजांत धनदांडग्या लोकांच्या मुलां-मुलीना आपल्या संस्थात प्रवेश आणि पदव्या देऊ लागले. तोपर्यंत सरकारी कॉलेजात केवळ मेरीटच्या आधारावर प्रवेश असायचा. वसंतदादा पाटलांनी धोरण बदलल्यानंतर काय घडले हे आपण पाहिलेच आहे. दादांच्या या धोरणाचे अनुकरण करण्याचा निर्णय गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाने ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस घेतला तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांनी या निर्णयास कडाडून विरोध केला आणि हाणून पाडला. ऐंशीच्या दशकात एक विद्यार्थी आणि पत्रकार म्हणून त्यावेळचे ते आंदोलन मी जवळून पाहिले.
शिक्षण क्षेत्रात असाच दूरगामी परिणाम करणारा निर्णय काही वर्षांपूर्वी त्यावेळचे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांनी घेतला होता. सरकारी प्राथमिक शाळांत सेमी- इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्याच्या त्यांच्या निर्णयावर तथाकथित मराठी भाषा प्रेमी लोकांनी कडक टीका केली होती. मात्र ज्या घरांत दोन्ही पालकांना इंग्रजी भाषेचे अजिबात ज्ञान नाही अशा घरांतील मुलांसाठी अनेक खाजगी शाळांनीही सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरु केलं आहे आणि अशा शाळांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारचे शिक्षणक्षेत्रांत दूरगामी प्रभाव करणारे निर्णय सत्ताधारी लोक – मग ते उच्चशिक्षित असो वा निमशिक्षित असो – क्वचितच घेत असतात.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि लाखो मुलांना शिक्षण सुविधा पुरवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं शिक्षण किती झालं होतं? ते स्वतः फार विद्याविभूषित नव्हते तरी त्यांच्या संस्थेने महाराष्ट्रात आणि देशात विक्रमी संख्येच्या शाळा-कॉलेजेस उभारली, त्यांचं कमी औपचारिक शिक्षण त्यांच्या या कर्तृत्वाआड आलं नव्हतं,
`फिलॉसॉफर किंग’ या भूमिकेत अगदी चपखल बसणारी देशातील दोन व्यत्क्तिमत्वे म्हणजे शंभर वर्षांपूर्वी आपल्या राज्यात सामाजिक समानता आणण्यासाठी आरक्षण तत्त्व लागू करणारे छत्रपती शाहू महाराज आणि जनतेसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेणारे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड. ब्रिटिशकाळात लोकमान्य टिळकांनी संपूर्ण देशाचे तीन दशके राजकीय नेतृत्व केले. बाळ गंगाधर टिळक हे स्वतः तत्त्वज्ञ होते हे त्यांच्या विविध विषयांवर लिहिलेल्या पुस्तकांच्या नुसत्या यादीकडे पाहिले तरी लक्षात होते. गोव्यात शिकताना तत्वज्ञान हा माझा बीए आणि एमए साठी खास विषय होता आणि टिळकांच्या भगवद्गीता या ग्रंथाचा अठरावा अध्याय मुंबई विद्यापीठाच्या आमच्या अभ्यासक्रमात होता.
महात्मा जोतिबा फुले यांचे तत्त्वज्ञान त्याकाळात कुठल्याही विद्याशाखेत शिकवले जात नसे याची कारणमिमांसा मी माझ्या आधीच्या एका लेखात दिली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषित व्यक्तीला नव्या भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्याचा सन्मान मिळाला. आणि शेकडो वर्षांची सामाजिक विषमता नक्षत्र करुन या सन्मानाचे त्यांनी चीज केले.
पंतप्रधान पंडित नेहरुंनी गोवा, दमण आणि दीव या साडेचारशे प्रदेशांची पोर्तगीज वसंत असलेल्या प्रदेशांची भारतीय लष्कर पाठवून १९ डिसेंबर १९६१ला मुक्तता केली तेव्हाही हे सालाझार महाशय पोर्तुगालचे हुकूमशहा होते ! एकेकाळी जगाच्या कानाकोपऱ्यांत वसाहती असलेल्या पोर्तुगालचे जागतिक स्तरावरचं प्रमुख स्थान कायम राखण्यात अर्थतज्ज्ञ असलेल्या सालाझारला साफ अपयश आलं.