इरफानला त्याचा ड्यू तसाही फार उशिरा मिळाला होता.. मग त्याला इतक्या लवकर का एग्झिट घ्यावी लागली याचं उत्तर काही केल्या मिळत नाहीये. एखाद्यामध्ये प्रचंड टॅलेंट असावं, आपल्यात काहीही टॅलेंट नाहीये असे टोकाचे विचार मनात येतील असे सतत त्याच्या आयुष्यात प्रसंग यावे, त्याने निकराने तरीही वाट काढत चालत राहवं, खूप खूप चालून, पायाचे तुकडे पाडून, टक्के टोणपे खात त्याला तगायला सरते शेवटी काडीचा आसरा मिळावा आणि मग आपल्या अंगी असलेल्या ऍक्टिंगच्या जोरावर त्याने त्या काडीचं मोठं जहाज बनवावं.. आता त्या जहाजात थोडं रिलॅक्स होऊन सफर करावी, अजून मोठे मोठे आराखडे आखावे असे दिवस यायला घातल्यावर नियतीने क्रूरपणा का करावा? आता या “का” ला उत्तर नाहीच. एखादा माणूस जावा आणि लोकांना आतून हळहळ व्हावी कदाचित हीच इरफानची कमाई.
Well said .